राज्यात मे महिन्यात आतापर्यंत 65 लाख 80 हजार 330 क्विंटल अन्नधान्याचे वाटप. तसेच 27 लाख 28 हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप- बाप्पुसाहेब मेहेर
राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 ते 25 मे पर्यंत राज्यातील 1 कोटी 44 लाख 75 हजार 735 शिधापत्रिकाधारकांना 65 लाख 80 हजार 330 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच 27 लाख 28 हजार 502 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 19 लाख 77 हजार 191 क्विंटल गहू, 15 लाख 18 हजार 925 क्विंटल तांदूळ, तर 21 हजार 98 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 3 लाख 99 हजार 579 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्न...